पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत सोमवारी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते निवेदन देणार

श्रीगोंदा दि २५ प्रतिनिधी  श्रीगोंदा व नगर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी समाधानी झाला असला तरी उभी पिके पाण्यात गेली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे त्यामुळे पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी भाजप चे युवा नेते विक्रमसिंह पाचपुते सोमवार दि २७ रोजी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देणार असल्याची माहिती भाजप चे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी दिली गेल्या दोन दिवसापासून श्रीगोंदा व नगर तालुक्यासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे या पावसाने बाजरी ,तूर ,मका ,उडीद, मुग, कांदा,  कपाशी आदी पिकांसह फळबागा पाण्याखाली गेल्या आहेत श्रीगोंदा मंडळात विक्रमी १०९मिलीमीटर पाऊस झाला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पिकांच्या बरोबर शेतीही वाहून गेली आहे त्यामुळे या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी यासाठी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते हे सोमवारी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देणार आहे असे नागवडे म्हणाले


 

 

Popular posts
कोरोना संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांना जिल्हाधिकारी द्विवेदी यांची 'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून उत्तरे प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा
Image
नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ◻महसूल व कृषी विभागाच्या आधिकाऱ्याना दिले आदेश.
Image
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रविवारी जिल्हावासियांशी साधणार फेसबुकवर संवाद कोरोना संदर्भातील नागरिकांच्या मनातील प्रश्नांना देणार उत्तरे
क्रीडा शिक्षक महाविद्यालयातील खेळाडूंना हिऱ्यांप्रमाणेपैलू पडून घडवत आहेत : ब्रिजलाल सारडा
Image