तर पुणे- मुंबईहून आलेल्यांवर कठोर कारवाई : सुनील गायकवाड

कर्जत : प्रतिनिधी

पुणे मुंबईहून येथे आलेल्या लोकांनी घरात थांबावे.बरेच लोक येथे पर्यटनाला  आल्यासारखे वागत आहेत.या लोकांचा स्थानिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहे.जर या लोकांचा त्रास कमी झाला नाही तर प्रशासनाला कठोर कारवाई करावी लागेल असे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दैनिक श्रीगोंदा सिटीझनशी बोलताना सांगितले.

जनतेचे मोठ्या प्रमाणावर सहकारी लाभत आहे. रस्त्यावरील गर्दी नियंत्रणात आणण्यात यश येत आहेत. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणेनेवरही पोलीस लक्ष ठेवून आहेत.जिल्ह्यांच्या सीमेवर खेड, सिद्धटेक येथे कर्मचारी तैनात केले आहेत. आरटीओचे लोकही मदतीला आलेले आहेत.त्यामुळे यावर नियंत्रण आणण्यात नक्कीच यश मिळणार असल्याचे पोलीस निरीक्षक
सुनिल गायकवाड यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत आहेत.त्यात पोलीस यंत्रणा अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.सोशल मीडियातून कर्जत पोलिसांना जनतेचे चांगले सहकार्य व पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे.


Popular posts
कोरोना संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांना जिल्हाधिकारी द्विवेदी यांची 'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून उत्तरे प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा
Image
पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत सोमवारी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते निवेदन देणार
मोदींचे २० लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ - सत्यजीत तांबे
Image
राज्यपाल नियुक्त विधानसभेसाठी मुस्लिम समाजाला संधी द्यावी ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पहेलवान
Image
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रविवारी जिल्हावासियांशी साधणार फेसबुकवर संवाद कोरोना संदर्भातील नागरिकांच्या मनातील प्रश्नांना देणार उत्तरे