हात जोडतो घरात बसा; पोलिसी खाक्या माहितेय ना: गृहमंंत्री देशमुख

मुंबई: वारंवार सांगूनही लोक रस्त्यावर उतरत असतील तर पोलिसांना ‘पोलिसी खाक्या’ दाखवण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिला. राज्यात लॉकडाउन केल्यानंतर लोकांनी ऐकलं नाही. परिणामी नाईलाजास्तव आम्हाला राज्यात संचारबंदी लागू करावी लागली, असं स्पष्टीकरण त्यांनी दिले.   


           देशभरात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना महाराष्ट्रातला आकडाही वाढतो आहे. राज्यात करोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या एकूण ४ चार झाली आहे. राज्यात या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असून लोकांनी सहकार्य करावे असं आवाहन देशमुख यांनी केलं. एका न्यूज चॅनलशो बोलताना देशमुख यांनी ही माहिती दिली.

राज्यात लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर शहरी भागातील अनेक नागरिक आपआपल्या गावाकडे रवाना झाले. घोळक्याने लोकं गावात आल्यानंतर त्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. खूप मोठ्या प्रमाणावर शहरातून लोकं गावात आली आणि त्यांना काही संशय आला तर ग्रामस्थांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती द्यावी, असंही देशमुख म्हणाले.


Popular posts
कोरोना संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांना जिल्हाधिकारी द्विवेदी यांची 'फेसबुक लाईव्ह'च्या माध्यमातून उत्तरे प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा
Image
पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत सोमवारी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते निवेदन देणार
मोदींचे २० लाख कोटींचे पॅकेज म्हणजे मृगजळ - सत्यजीत तांबे
Image
राज्यपाल नियुक्त विधानसभेसाठी मुस्लिम समाजाला संधी द्यावी ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पहेलवान
Image
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रविवारी जिल्हावासियांशी साधणार फेसबुकवर संवाद कोरोना संदर्भातील नागरिकांच्या मनातील प्रश्नांना देणार उत्तरे